Saturday, October 14, 2017

आयुर्वेद

*१०० वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र*

*१) वात २) पित्त ३) कफ*
वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच *निरोगी* म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात
      *आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे* ?

*त्यासाठी हे वाचुन कृतीत आणा*, *जादु होईल*
----------------------------------------------
१) *सकाळी लवकर उठावे म्हणजे *ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.*

२) दात घासण्याआधी *कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे *१- ३* ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

३) पाणी पिल्यावर पोटावर *दाब* पडतो आणि *प्रार्तविधी* करुन घ्यावा.

४) त्यानंतर *दात घासावे* त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी ई. किंवा कोणतेही *स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट* वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन)
दंत रोग दूर राहतात

५) नंतर *अंघोळ* करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना *गरम पाणी* कधीच वापरु नये.

६) सकाळी *७.३० ते ९.३०* च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)
जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) *जेवणाच्या अगोदर* *४५ *मिनीट आणि *जेवणानंतर *१ * तासाने पाणी  प्यावे.* जेवताना *एक ते दोन घोट* पाणी प्यायला हरकत नाही.

८) *सकाळी फळांचा ज्युस प्या*  दुपारी *दही ताक किंवा मठ्ठा प्या* आणि  *झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तुप व हळद टाकुन प्या.*
९) नेहमी *पाणी* पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे *उभे राहून, गड़बडीने पाणी पिवु नये.*
( *शरीराला दररोज लाळेची गरज असते* जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी *घोट घोट* करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर *१० ते १५* मिनीटे *वज्रासनात* बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी *(२० मिनीटे झोपावे)* घ्यावी. आणि *संध्याकाळी* जेवण केल्यावर *३ तास झोपू नये* व *शतपावली* करावी.

११) अॅल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिवु नये व काहीही खावू नये. अॅल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

१२) भोजन करतांना नेहमी *मातीच्या* भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) *झोपताना* नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.
*फिल्टर तेलच वापरा. * (रिफाईंड तेल विष आहे)*

१५) *सेंन्द्रिय गुळाचा* वापर करावा. *(साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)*

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा *गुळ* खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त *सेंधा मीठ* वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी *६ ते ७ तास झोप* आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज *एक तास प्राणायाम,* *१५ मिनीट योगासने,* व जेवढे जमेल तेवढे *सूर्यनमस्कार* करणे.

२०) *प्राणायाम* मात्र नियमित करणेच चांगले.

२१) रोज न चुकता *एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा.* तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी,कोबी यांचा वापर करावा.

२२) *जास्त* वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील.

२३) *भारतीय* रस म्हणजे *उसाचा रस,कोकम* *सरबत,आवळा रस, लिंबू* *सरबत, फळांचा ज्युस* हेच आपल्या शरीराला *उत्तम पोषक* आहेत.

२४) भारतीय *पोशाख* घाला व तो *सैल* असावा, जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो *पांढराच* असावा.

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये *८४* प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.
*लघवीला* आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, *अश्रू* बाहेर येवू द्यावेत, * *रडायला* आले तर ऱडावेच, *हसायला* आले की भरपुर हसावे, *जांभई* आली की द्यावीच, *शिंक* आली की बिनधास्त द्यावी , *अपानवायू* आला की तसाच बाहेर येऊ द्यावा,

२६) *कफ* कधीच *गिळू* नये.

*वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो

No comments:

Post a Comment